sandeep Shirguppe
सह्याद्रिच्या कुशीत १९६१ साली बांधण्यात आलेल्या कोयना धरणाला आज तब्बल ६१ वर्षे पूर्ण झाले.
कोयना धरण मागच्या साठ वर्षांहून अधिक काळापासून हे धरण महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्रप्रदेशची तहान भागवत आहे.
१०५ टीएमसी साठा असलेले धरण मागच्या ६१ वर्षात तब्बल ५२ वेळा हे भरले. तर तर नऊवेळा साठवण क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठा राहिला.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या धरणाचे उद्घाटन करण्यात आले. तर १,९६० मेगावॅट विजनिर्मिती या धरणाच्या पाण्यातून केली जाते.
मागच्या कित्येक वर्षांपासून पाण्यात सिंचनासह विजेचा प्रश्न मार्गी लावण्यात व्यवस्थापन यशस्वी ठरले. आजवर या धरणाने राज्य प्रकाशमान करण्याबरोबरच आसपासच्या राज्यांची तहान भागविली आहे.
अतिवृष्टीच्या शिवसागर जलाशयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात साठा केला जातो यातून पूढचे एक वर्ष पाण्याची चिंता मिटवली जाते. दरम्यान धरण परिसरात भूकंपाचे लाखो धक्के बसले आहेत.
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरेल का, याची चिंता लागून राहते. धरण भरले नाही तर सिंचनासह वीज आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
कोयना धरणाची उभारणी झाल्यानंतर सुरुवातीची साठवण क्षमता ९८.७८ टीएमसी होती. २००३ सालापासून साठवण क्षमतेत वाढ होऊन ती १०५.२५ टीएमसी झाली.
कोयना धरण हे एक सुंदर पिकनिक ठिकाण आहे. धरणाच्या शेजारी असलेले नेहरू गार्डन देखील पाहण्यासारखे आहे.
कोयना जलविद्युत प्रकल्प ही भारतातील सर्वात मोठी पूर्ण झालेली जलविद्युत सुविधा आहे. वीज निर्मितीच्या क्षमतेमुळे कोयना नदी महाराष्ट्राची “भाग्यलक्ष्मी” म्हणून ओळखली जाते.