Mahesh Gaikwad
संक्रातीनंतर गुळाची मागणी कमी झाल्यामुळे याचा गुळाच्या दराला फटका बसला आहे.
गेल्या महिनाभरात गुळाचे दर प्रति क्विंटलला चारशे रुपयांनी घसरले आहेत.
संक्रातीमध्ये गुळाला सरासरी ४२०० रुपयांचा दर मिळत होता. हाच दर आता ३८०० रुपयांपर्यंत खाली आला आहे.
गुजरातमधून राज्यातील गुळाची मागणी घटल्यामुळे गुळाच्या दरात घट झाल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे गेल्या महिन्याच्या तुलनेत आवक निम्म्यावर आली आहे. तरीही गुळाला दर नसल्याने गूळ बाजारावर मंदीचे सावट कायम आहे.
यंदा उसाचा हंगाम कमी असल्याने गुळाचे उत्पादन कमी होईल यामुळे दरही चांगले राहतील, असा अंदाज होता.
तसेच यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत गुऱ्हाळाची संख्या घटल्याने हंगाम संपेपर्यंत तरी गूळ दर टिकून राहतील असा अंदाज होता.