Swapnil Shinde
जगात २५ देशांमध्ये गुळाचे उत्पादन घेतले जाते. त्यामध्ये तब्बल ५५ टक्के वाटा हा भारताचा आहे.
गूळ उत्पादनात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू आदी राज्य आघाडीवर आहेत. त्यामध्ये कोल्हापूरच्या गूळाला जगभर मागणी आहे.
कोल्हापूरी चप्पल, तांबडा-पांढरा रस्ता त्याचबरोबर कोल्हापूरच्या ख्याती गुळामुळे सातासमुद्रापार गेली.
पण मागील काही वर्षांपासून गुळ गुऱ्हाळघरांना घरघऱ लागली आहे.
पूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून गुऱ्हाळघर चालवली जात होती. सध्या साखर कारखान्यांची संख्या वाढल्याने शेतकरी आपला ऊस कारखान्यात घालण्यास पसंती देत आहेत.
साखऱेच्या तुलनेत गुळाचा अपेक्षित दर मिळत नसल्याने अनेक व्यावसायिकांनी आपला व्यवसाय बंद केला
शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून एफआरपीप्रमाणे ऊसाला भाव मिळत असल्याने शेती आपला ऊस गूळ उत्पादकांना देण्यास तयार नाहीत.
भट्टीवर व कढईवर काम करण्यासाठी कुशल मजूर लागतात. कष्टाचे काम करण्यास स्थानिक कामगार मिळत नाहीत