Team Agrowon
गुळाला किफायतशीर दर मिळत नाही, तोवर सौदे होऊ देणार नाही अशी भूमिका घेत कोल्हापूर बाजार समितीत शेतकऱ्यांनी गुळाचे सौदे मंगळवारी (ता. 22) बंद पाडले.
व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक बंद व्हावी, कर्नाटकातून होणारी आवक बंद करावी अशा मागण्याही यावेळी शेतकऱ्यांनी केल्या.
यावेळी बाजार समितीचे प्रशासक प्रकाश जगताप यांनी गूळ उत्पादकांच्या मागण्यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर गुळाचे सौदे पुन्हा सुरू करण्यात आले.
बाजार समितीत सकाळी 10 वाजता सौदे सुरू झाले तेव्हा गुळाचे सौदे 3700 रुपयांच्या वर निघाले होते.
तर त्याचवेळी काही गुळाचे सौदे मात्र त्यापेक्षाही कमी दरात निघाले. त्यामुळे गूळ उत्पादक संतप्त झाले. त्यातून सौदे बंद करत वाढीव दराची मागणी गूळ उत्पादकांनी केली.