Team Agrowon
गेल्या दोन दिवसांत राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे.
गारपिटीमुळे अनेक ठिकाणी पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यातही कळमनुरी तालुक्यातील वरूड येथे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे.
यामध्ये पपई, केळी अशा फळपिकांची मोठी हानी झाली आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी या नुकसानाची पाहणी केली.
यावेळी सत्तार यांच्यासोबत खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर हेही उपस्थित होते.
यावेळी सत्तार यांनी झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
तसेच एकही नुकसानग्रस्त पंचनाम्यापासून वंचित राहता कामे नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.