Anuradha Vipat
हिंदू धर्मशास्त्रात अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या दानाला विशेष महत्त्व आहे.
अशी श्रद्धा आहे की या दिवशी तुम्ही जे काही दान करता त्याचे पुण्य तुम्हाला केवळ या जन्मातच नाही, तर जन्मांतरापर्यंत अक्षय मिळते.
अक्षय तृतीयेला पितरांच्या नावाने दान केल्याने त्यांना सद्गती मिळते आणि कुटुंबावरील पितृ दोष दूर होतो
कळत-नकळत झालेल्या पापांतून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी दान दिले जाते.
हा सण कडक उन्हाळ्यात येतो, म्हणून तहानलेल्यांना पाणी पाजणे किंवा पाण्याचे दान करणे हे सर्वात मोठे 'पुण्यकर्म' मानले जाते.
या दिवशी पाण्याचा माठ (घडा), थंड पाणी किंवा सरबत नक्की दान करा
गरजू लोकांना भोजन देणे, विशेषतः गूळ, तांदूळ किंवा गहू असे दान केल्याने पुण्य मिळते.