Anuradha Vipat
बाजारात मिळणारे आंबे नैसर्गिकरित्या पिकलेले आहेत की रसायने वापरून, हे ओळखणे खूप गरजेचे आहे.
नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याचा रंग सगळीकडे एकसारखा नसतो. त्यात हिरवे आणि पिवळे असे दोन्ही छटा दिसू शकतात.
नैसर्गिक आंब्याला एक विशिष्ट गोड आणि तीव्र सुगंध येतो, जो दुरूनही जाणवतो.
नैसर्गिक आंबा दाबल्यावर सर्व ठिकाणी सारखा मऊ लागतो. रासायनिक आंबा वरून मऊ वाटला तरी आतून कडक असू शकतो.
आंबा पाण्याने भरलेल्या बादलीत टाका. जर तो तळाला गेला, तर तो नैसर्गिकरित्या पिकलेला असतो.
जर आंबा पाण्यावर तरंगला, तर तो रसायने वापरून पिकवलेला असण्याची शक्यता जास्त असते.
नैसर्गिक आंबा खाताना जिभेला जळजळ होत नाही. रासायनिक आंब्यामुळे तोंडात किंवा घशात थोडी जळजळ जाणवू शकते.