Team Agrowon
शेळ्यांना झाडपाल्याची जास्त गरज असते. त्यासाठी शेळ्यांना दररोज पाच किलो हिरवा चारा, एक किलो वाळलेल्या चारा द्यावा.
अाहारामध्ये क्षार मिश्रणाचा वापर केल्यास कमतरतेचे आजार कमी होऊन मांस उत्पादन वाढते. प्रतिजैविकाचा वापर केल्यास शेळीची रोगप्रतिकारक क्षमता वाढते व आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.
उन्हाळ्यात ११ ते ४ या काळात भरपूर ऊन असते. उन्हामुळे शेळ्यांमध्ये उष्माघाताचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे शेळ्यांना सकाळी लवकर म्हणजे ६ ते ९ या वेळेस किंवा संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत चरण्यासाठी सोडावे.
चरण्यासाठी विनाकारण जास्त अंतर शेळ्यांना चालवू नये. शक्यतो उन्हाळ्यात गोठ्यातच चारा खाऊ घालावा.
उन्हाळ्यात चाऱ्यासाठी दूरवर भटकंतीमुळे गरजेप्रमाणे पोषणतत्त्वे न मिळाल्यामुळे शेळ्यांची प्रकृती खालावते.
उन्हाळ्यामध्ये शेळ्यांच्या लेंड्यांपासून अमोनिया जास्त प्रमाणात बाहेर पडतो. त्यामुळे गोठ्यातील हवा खेळती राहणे आवश्यक आहे.