Team Agrowon
शरीरातून पाणी गमावणे ही सामान्य प्रक्रिया आहे; पण पाणी जर जास्त प्रमाणात शरीरातून बाहेर पडत असेल तर मात्र डिहायड्रेशन'चा त्रास होतो.'
'डिहायड्रेशन'मुळे शरीरातील खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स, सोडियम, पोटॅशिअम क्लोराइड ची पातळी असमतोल किंवा कमी होते.
शरीरातील पाण्याची पातळी कमी होते.जनावराला डिहायड्रेशन झाल्यानंतर त्वचेची लवचिकता कमी होते.
सतत आळस येणे, त्वचा घट्ट होणे , वजन कमी होणे आणि डोळे कोरडे होतात.
त्वचा निस्तेज होते, डोळे खोलवर जातात. तोंडातून लाळ येणं अशी लक्षणे दिसतात.
डिहायड्रेशन झाल्यामुळे जनावर अचानक खाली पडू शकते.
कमी प्रमाणात पाणी घेतले किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात ते गमावले तर त्याचा परिणाम डिहायड्रेशनमधे होतो.