sandeep Shirguppe
घरातील स्वयंपाकापासून, हॉटेल, ढाबा, या सर्वच ठिकाणी आपण पनीरच्या भाजीला सर्वाधिक पसंती देतो. यामुळे पनीरची भाजी ही सर्वाधिक आवडती मानली जाते.
दरम्यान पनीरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या भेसळीमुळे आरोग्यावर परिणाम होण्याची भीती असते.
मुळात पनीरमध्ये केली जाणारी भेसळ ओळखू येत नसल्याने अनेकांची फसवणूक होते. यामुळे आपण खात असलेले पनीर भेसळयुक्त आहे की चांगले हेच समजत नाही.
भेसळयुक्त पनीर ओळखायचे असेल तर ते रबरासारखे लागते. याचबरोबर शुद्ध पनीर चिकट असते तुम्ही खात असलेल्या पनीरला चिकटपणा नसेल तर त्यात भेसळ आहे हे समजून जावे.
भेसळयुक्त पनीर लगेच शिजत नाही, ते मऊ होत नाही. या पनीरमध्ये दुधाचा येणारा चविष्ठ वास येत नाही.
उकळलेल्या पाण्यात आयोडिन टिचरचे थेंब टाकून त्यात पनीरचा तुकडा टाका. जर पनीरचा रंग बदलला तर नक्कीच यात भेसळ आहे हे ओळखता येईल.
एखाद्यावेळेस जर पनीरमध्ये भेसळ असल्याचे लक्षात आले तर यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करता येऊ शकते.
कोल्हापूर जिल्ह्यात २०२२-२३ या एका वर्षात ४ लाख ८१ हजार १६० रुपयांचे तब्बल १७८७ किलो पनीर अन्न व औषध प्रशासनाकडून जप्त करण्यात आले आहे.
अन्नपदार्थामध्ये अशी भेसळ आढळल्यास ग्राहकांनी तक्रार करावी. अन्न व औषध प्रशासन कोल्हापूर विभागाचे सहायक आयुक्त तुषार शिंगाडे यांनी आवाहन केले.