Team Agrowon
आपण आजारी पडल्यानंतर आपल्या आरोग्याची तपासणी तशा प्रकारची शेतकरी शेतजमिनीची तपासणी करत नाहीत.
पाणी, रसायनिक खतांचा वापर केल्यानंतर तिची सुपीकता कमी झाली. जमिनीचा पोत बिघडल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन घटत जावू लागले.
जमिनीचं आरोग्य हे जमिनीत असणारे घटक आणि जमिनीचे गुणधर्म यावर अवलंबून असतं.
जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी तिथल्या मातीत कोणती मूलद्रव्ये किती प्रमाणात आहे, ते जाणून घेणे गरजेचे आहे.
यासाठी माती परिक्षण करणे गरजेचे असते. जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कार्यालयार्फे माती परीक्षण केले जाते.
मातीचा नमुना प्रयोगशाळेत नेल्यानंतर तिथं त्याची नोंदणी केली जाते. त्याला आरोग्य पत्रिका म्हणतात. त्यासाठी 275 रुपये इतकी फी आकारली जाते आणि 45 दिवसांत आरोग्य पत्रिका दिली जाते.
पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी हंगामापूर्वी माती परीक्षण केल्यास फायदेशीर ठरते
माती परीक्षण अहवालानुसार खते दिल्यास ती योग्य, संतुलित आणि शिफारशित प्रमाणात दिली जातात. यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारतं आणि तिची उत्पादकता वाढीस लागते.