Team Agrowon
पिकाची पाने वाळणे हे हळद पीक परिपक्वतेचे प्रमुख लक्षण मानले जाते.
काढणीआधी १५ ते ३० दिवस पिकास पाणी देणे बंद करावे. पाणी देणे बंद करताना प्रथम थोडेथोडे कमी करून नंतर पूर्ण बंद करावे. पाला वाळल्यानंतर जमिनीच्या वर १ इंच खोड ठेवून धारदार विळ्याच्या साह्याने पाला कापावा. पाला बांधावर गोळा करून ठेवून शेत ४ ते ५ दिवस चांगले तापू द्यावे.
लागवडीच्या पद्धतीनुसार हळद काढणीसाठी पद्धत अवलंबवावी. सरी वरंबा पद्धतीत टिकाव किंवा कुदळीच्या साह्याने हळदीची खांदणी करावी.
खांदणी करून काढलेले कंद २ ते ३ दिवस सूर्यप्रकाशात चांगले तापू द्यावेत. त्यामुळे कंदास चिकटलेली माती पूर्णपणे निघण्यास मदत होते.
हळदीची काढणी केल्यानंतर लवकरात लवकर हळदीची प्रक्रिया करावी. काढणी केल्यानंतर साधारणत: १५ दिवसांच्या आत त्यावर प्रक्रिया करावी. म्हणजे हळदीची प्रत व दर्जा चांगला राहतो.
हळदीचे बेणे त्वरित झाडाखाली सावली असलेल्या थंड ठिकाणी ढीग करून साठवावेत.