Team Agrowon
यंदाच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजनेसाठी अर्ज करण्यास सुरु झाली आहे
यासाठी शेतकऱ्यांनी इच्छुक शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
पीक विम्या योजनेत कर्जदार, तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे.
खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सोयाबीन, कापूस व खरीप कांदा अशा १४ पिकांना पीक विमा मिळणार आहे.
यंदापासून महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ‘सर्वसमावेशक पीकविमा योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार शेतकरी वाट्याची विमा हप्ता रक्कम राज्य सरकार भरणार आहे.
शेतकऱ्यांना फक्त १ रुपया भरून पीकविमा पोर्टलवर नोंदणी करता येईल.