Anuradha Vipat
मातीच्या माठातील नैसर्गिकरित्या थंड आणि शुद्ध पाणी पिणे आरोग्यासाठी नेहमीच वरदान मानले जाते.
आपल्या पूर्वजांच्या काळापासून पाणी साठवण्यासाठी मातीचा माठ वापरला जात आहे. यामागे केवळ परंपरा नाही, तर मोठे वैज्ञानिक आणि आरोग्यदायी फायदे लपलेले आहेत.
मातीच्या माठाला सूक्ष्म छिद्रे असतात. या छिद्रांमधून पाण्याचे बाष्पीभवन होते. यामुळे पाणी फ्रिजसारखे हाडे गोठवणारे थंड न होता, घशाला आणि पोटाला सुखावणारे नैसर्गिक थंड होते.
जेव्हा आपण माठात पाणी ठेवतो, तेव्हा ते मातीच्या थरांमधून झिरपल्यामुळे पाण्यातील अशुद्धी, कचरा आणि हानिकारक रसायने नैसर्गिकरित्या नष्ट होतात.
माठातील पाणी पाण्याचा pH स्तर नियंत्रित ठेवते. हे अल्कधर्मी पाणी प्यायल्याने पोटात ॲसिडिटी, गॅस आणि छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवत नाही.
माठातले पाणी शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी संतुलित राखते आणि पचनक्रिया मजबूत करते.
माठातल्या पाण्याचे तापमान शरीराच्या तापमानाशी सुसंगत असते. त्यामुळे हे पाणी प्यायल्याने घशाला कोणतीही दुखापत होत नाही आणि खोकल्याचा त्रास टळतो.