Sanjana Hebbalkar
सध्या डेंग्यूचे रुग्ण वाढताना दिसत आहे. प्रदूषण ढगाळ वातावरणामुळे अनेक गांवामध्ये डेंग्यूचे पेंशट दिसत आहेत
यावेळी मात्र डेंग्यू झाल्यानंतर डेंग्यूच्या रुग्णांना किवी आणि पेरु फळ खाण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो.
ज्यावेळी एखाद्या निरोगी व्यक्तीला डेंग्यूचा डास चावतो तेव्हा त्याला डेंग्यू होतो. यामध्ये त्याच्या पेशीचीं कमी होते.
डेंग्यूने ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्सची पातळी ८० ते ९० टक्के पेक्षा कमी असते. हे प्लेटलेटस वाढवण्याची अत्यंत गरज असते नाहीतर रुग्ण दगावण्याची शक्यता असते.
किवीच्या फळात आपल्या शरीरातील प्लेटलेटस वाढवण्याची क्षमता असते त्यामुळे शिवाय हे फळ पोषक देखील असते त्यामुळे डॉक्टर हे खाण्याचा सल्ला देतातय
याशिवाय देखील किवीचे प्रचंड फायदे देखील आहेत. डोळ्याच्या चांगल्या आरोग्यासाठी किवी फळ पोषक ठरते
किवीच्या अॅटी-डायबेटिक गुणधर्मामुळे मधुमेही रुग्णांसाठी किवी उत्तम फळ आहे. मात्र हे फळ जास्त न खाता आठवड्यातून तीन ते चार वेळा खावंं