Mahesh Gaikwad
भारतामध्ये आयुर्वेदिक उपचांरांचे अनन्य साधारण महत्त्व आहे. आयुर्वेदामध्ये झाडपाला, झाडांच्या मुळ्या यांचा औषध म्हणून वापर करतात.
अंजीर हे एक असे फळ आहे, ज्याचे आरोग्यासाठी अगणित फायदे आहेत. अनेक गंभीर आजारांमध्ये अंजीराचे सेवन गुणकारी आहे.
अंजीरामध्ये मँग्निज, मॅग्नेशियम आणि लोह यासारखे पोषक तत्त्व असतात. जे आपल्या आरोग्याच्यादृष्टीने फायदेशीर असतात.
अंजीराचे आरोग्यासाठी अनेक फायदे असले, तरी याचे वैशिष्यपूर्ण पध्दतीने सेवन केले तरच त्याचे फायदे होतात.
एका बाटलीत १५ दिवसांपर्यंत अंजीर भिजवत ठेवावेत आणि मग ते खावेत. अशाप्रकारे अंजीर खाल्ल्याने स्त्रियांचे प्रजनन स्वास्थ चांगले राहते.
भिजवलेले अंजीर खाल्ल्याने स्त्रियांचा हार्मोनल बॅलन्स नियंत्रणात राहतो. याशिवाय भिजवलेल्या अंजीराच्या सेवनाने बध्दकोष्ठतेची समस्या दूर होते.
दररोज भिजवलेले अंजीर खाल्ल्याने शरीरातील मेटाबॉलिझम वाढते आणि शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.
याशिवाय हाडे मजबूत होतात आणि हाडांशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे.