Team Agrowon
बेल हे उन्हाळ्याच्या दिवसांत मिळणार खास फळ आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत बेलफळाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असते.
उन्हाळ्याच्या दिवासांमध्ये बेलफळाच्या ज्यूस पिल्याने शरिराचे तापमान थंड राहण्यास मदत होते.
बेलफळातील काही घटक रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी तसेच रक्तदाब संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात.
बेलफळापासून चांगल्या प्रतीचे पदार्थ करता येतात. डायरिया, डिसेंट्री, गॅस्ट्रॉइन्टेस्टीनल या सारख्या आजारांमध्ये बेलफळाचा गर अत्यंत गुणकारी असतो.
बेलफळात क जीवनसत्त्व, बी कॉम्प्लेक्स ही जीवनसत्चे, कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात आढळतात.
देशातील ९६ टक्के बेलफळाचे उत्पादन फक्त दोन राज्यांमध्ये होते. यामध्ये ओडीशा पहिल्या तर झारखंड राज्य दुसऱ्या स्थानावर आहे.
याशिवाय महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातही बेलफळाचे उत्पादन होते.