Team Agrowon
आमलकी एकादशीनिमित्त आज पंढपूरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात द्राक्षांची आरास करण्यात आली होती.
आज पहाटे मंदीरात ही सुंदर द्राक्ष आरास करण्यात आली.
पुणे आणि बारामतीच्या भाविकांनी मंदिरात एक टन द्राक्षाची आरास केली होती. यात बाबासाहेब रामचंद्र शेंडे, (बारामती), पुनम बाबासाहेब शेंडे, (बारामती) आणि सचिन आण्णा चव्हाण,(पुणे) या भाविकांनी ही सजावट केली.
मात्र काही तासांत ही द्राक्ष गायब झाल्याचं समोर आलं आहे.
हे द्राक्ष दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी प्रसाद म्हणून नेल्याचा मंदिर समितीचे म्हणणे आहे.
त्यामुळे मंदिरातील द्राक्षे नेमकी भाविकांनी नेली की अन्य कोणी यायची जोरदार चर्चा सुरू आहे.
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात अनेक भाविक विविध फळांची एकादशीनिमित्त आरास करत असतात.