Team Agrowon
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारण्यासाठी एक लाख ६० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कांदा चाळीसाठी शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे.
यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याची रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली आहे.
रांगडा कांद्याची साठवणूक क्षमता चांगली असल्याने तो सुकवून साठविला जाऊ शकतो.
कांदा साठविण्यासाठी अद्यायावत गोदाम उपलब्ध नसल्याने खरीप हंगामातील कांदा काढला की लगेच विकावा लागतो.
स्थानिक बाजारपेठेची व निर्यातीची मागणी भागविण्यासाठी कांद्याची साठवणूक क्षमता वाढविणे आवश्यक आहे.