Anuradha Vipat
माणसाच्या आयुष्यातील वाईट काळ संपण्यापूर्वी निसर्ग किंवा ज्योतिषशास्त्रानुसार काही शुभ संकेत मिळतात .
जर तुम्हाला दररोज पहाटे ३ ते ५ दरम्यान आपोआप जाग येत असेल तर तो वाईट काळ संपून नवीन सकारात्मक बदलाची सुरुवात होण्याचा मोठा संकेत मानला जातो.
स्वप्नात देवी-देवतांचे दर्शन होणे, मंदिर दिसणे किंवा स्वतःला पूजेत सहभागी होताना पाहणे हे वाईट काळ संपत असल्याचे लक्षण आहे .
अचानक घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होणे, सुकलेली झाडे पुन्हा हिरवीगार होणे हे चांगल्या दिवसांची चाहूल असते.
दारात गाय येणे, पक्षांचा किलबिलाट वाढणे किंवा घराच्या अंगणात चिमण्यांनी घरटे बांधणे हे वाईट वेळ दूर होण्याचे शुभ संकेत मानले जातात.
ज्योतिषशास्त्रानुसार, पुरुषांच्या शरीराचा उजवा भाग आणि महिलांच्या शरीराचा डावा भाग फडफडू लागल्यास लवकरच काहीतरी चांगली बातमी मिळण्याची शक्यता असते
अनपेक्षित मार्गाने धनप्राप्ती होणे हे भाग्य बदलण्याचे लक्षण आहे .