sandeep Shirguppe
इथून पुढचे काही दिवस उन्हाचा तडाखा वाढणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
याबाबत नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. दरम्यान उष्माघातापासून संरक्षण मिळविण्यासाठी काही गोष्टी पाळणे गरजेचे आहे.
शरीर डिहायड्रेड ठेवण्यासाठी ताक, नारळ पाणी, उसाचा रस, लस्सी, इलेक्ट्रोल पावडर, पाण्यात मिसळून सब्जाचं पेय घ्यावे.
आपल्या रोजच्या आहारात काकडी, गुलकंद, कलिंगड, यासारखी पाणीदार फळभाज्या खाव्यात.
वेळोवेळी चेहऱ्यावर गार पाणी मारा. तसेच उष्णतेचा खूप त्रास होत असेल तर गार पाण्याने आंघोळ करा.
चहा,कॉफी मद्यपान करू नका. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यापेक्षा थंड पाणी प्या.
हलके आणि सौम्य रंगाचे, कॉटनचे कपडे वापरण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे फार त्रास होणार नाही.
उन्हातून फिरताना डोकं झाका. दुचाकीवरून जाणार असाल तर सनकोट वापरा. तसेच लोकांनी शक्यतो छत्री वापरणे गरजेचे आहे.