Team Agrowon
जळगाव जिल्ह्यात पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. रावेर यावल भुसावळ तालुक्यात केळी, गहू, मका पिकाला मोठा फटका बसला आहे.
ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी मात्र संकटात सापडला आहे.
वाशीमसह कारंजा, मानोरा, रिसोड आणि तालुक्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे.
त्यामुळे रब्बीतील काढणीला आलेल्या गहू, हरभरा, पिकांसह भाजीपाला आणि संत्रा बागेच मोठं नुकसान झाले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकांना मोठा फटका बसला असून पिके भूईसपाट झाली आहेत.
हिंगोली जिल्ह्यात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे व रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
रात्री झालेल्या वादळी पावसामुळे बहुतांश पीके भूईसपाट झाली आहेत.
या पावसामुळे आंब्या सह फळबागांचे ही मोठे नुकसान झाले.