Team Agrowon
आयआयएम सारख्या अनेक प्रतिष्ठित संस्थांच्या अहवालानुसार वायदे बाजारबंदीचा महागाई रोखण्यात काही परिणाम होत नाही.
वायदेबाजार बंदी ही फक्त शेतीमालाचे दर पाडण्यासाठीच केली गेली आहे. हरभऱ्याचे दर गेले वर्षभर हमीभावापेक्षा पेक्षा कमी राहिले आहेत. तरी सुद्धा त्याच्या वायद्यांवर बंदी कायम आहे.
सेबीने सरकारच्या दबावाखाली हा निर्णय घेतला असावा.
महागाई कमी ठेऊन निवडणूक जिंकण्यासाठी सरकार सेबीवर दबाव आणीत असेल तर सेबीने त्यास बळी पडू नये. तातडीने मुदतवाढ मागे घ्यावी.
रब्बीतील शेतीमाल बाजारात येण्यास लवकरच सुरुवात होईल.
सेबीने वायदेबाजारबंदी उठवावी या मागणीसाठी सेबीच्या मुंबई येथील कार्यालयासमोर धरणे स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केलेआहे.