Team Agrowon
महाराष्ट्रामध्ये केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. अंदाजे ९० हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर केळीचं उत्पादन घेतलं जातं.
अवकाळी पाऊस आणि गारपीठामुळे केळी पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्याला चांगला फटका बसतो
जळगाव जिल्ह्यातील 'सावदा' नुकतेच पहिली राज्यस्तरीय केळी पिक परिषद पार पडली होती.
या परिषदेत केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली होती.
केळीचा अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी केळीसाठी केलेला खर्च देखील निघत नाही
केळीला अद्याप हमीभाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अत्यंत कमी दरात केळीची विक्री करावी लागत आहे.
केळीचा शालेय पोषण आहारामध्ये समावेश केल्यास सरकारला हमी भाव देणं शक्य होणार आहे.
केळीला हमीभाव न मिळाल्यास केळी उत्पादक संघ रस्त्यावर उतरुन आक्रमक आंदोलन करणार, असा इशारा केळी उत्पादक संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे