Team Agrowon
वाळवा तालुक्यातील साटपेवाडी येथे जात असताना रस्त्यात एका शेतात बैलांच्या सहाय्याने ऊस भरणी सुरू होती.
तिथूनच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील कामानिमित्त जात होते.
आजही ग्रामीण भागात बैलाने ऊस भरणी केली जाते.
पारंपरिक आणि आधुनिक शेती तंत्राची सांगड घालून शेतकरी शेती करत आहेत ही कौतुकास्पद गोष्ट आहे.
कुतुहलापोटी प्रतीक यांनी देखील बैलाच्या सहाय्याने ऊस भरणी प्रक्रियेचा आनंद घेतला.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून मशागतीची प्रक्रिया जाणून घेतली.