Team Agrowon
बदलत्या काळानुसार शेती आमूलाग्र बदल होतायत. शेतकऱ्यांची मेहनत करण्याची क्षमता आणि अभिनव प्रयोगामुळे शेती नवीन प्रयोग होत आहे.
याच प्रयोगाच्या जोरावर बारामती माळेगाव खुर्द येथील शेतकरी प्रशांत काटे यांनी शेतात खजूराची लागवड केली आहे.
खजूराची शेती वाळवंटी भागात केली जाते. परंतु आता याच वाळवंटी भागातील शेती चक्क महाराष्ट्रात होऊ लागली आहे.
आधुनिक शेतीचा अवलंब करत गुजरात मधील वलसाड येथून खजूर शेतीची माहिती घेतली.
त्यानंतर शेतकरी काटे यांनी खजुर शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाची माहिती घेतली. त्यानंतर रोपांची लागवड केली.
या झाडांना ५ वर्षांनी फळ लागतात. एक झाड ८० ते १०० वर्षांपर्यंत फळ देतं. त्यातून प्रत्येक झाडाला २५ ते ३० किलो फळे लागतात.