Team Agrowon
आषाढी एकादशीला पंढरपूरात विठ्ठलाच्या देवाच्या दर्शनाला आलेला वारकरी गावाकडे जाताना प्रसाद म्हणून हा चुरमुरे, साखरकांड्या, बत्तासे यासारख्या पेढे प्रसाद म्हणून नेत असतात
वारकऱ्यांसाठी पंढरपूरचा पेढा म्हणजे केवळ मिठाई नसून त्याला विठुरायाच्या भक्तीची, मायेची गोडी लाभली असते.
वर्षभरात पंढरपुरात वर्षभर प्रतिदिन एक टनापर्यंत पेढ्यांची विक्री सुरू असते.
पण आषाढी यात्रेच्या कालावधीत हीच विक्री तब्बल ३ ते ४ टनांपर्यंत होत असते
पण गेल्या काही वर्षांमध्ये चांगल्या प्रतीचा पेढा मिळत नसल्याने आता मंदिर परिसरात जसे मिळतील तसे पेढे प्रासादिक दुकानदारांकडून विकत नेत आहेत.
आषाढी वारीमध्ये भेसळयुक्त पेढा विक्री करणाऱ्या दोन विक्रेत्यांसह पाचजणांवर अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने बुधवारी ही कारवाई केली
पथकाकडून पेढ्याची तपासणी करताना सर्वप्रथम त्यावर आयोडिन टाकून पाहिले असता त्यामध्ये स्टार्च या अन्न पदार्थाची भेसळ आढळून आली.