Team Agrowon
खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांकडून मशागतीच्या कामाना वेग आला आहे.
खरीप हंगामातील बियाणे, खते आणि निविष्ठांच्या खेरदीसाठी शेतकरी पैशांची जुळवाजु करत आहेत.
पीककर्जासाठी शेतकऱ्यांच्या बँकेच्या दारातील फेऱ्याही वाढल्या आहेत. पण अनेक बँका सीबील स्कोरचे कारण देत पीककर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पीककर्ज देताना सीबील स्कोरची न घालण्याचे आदेश राज्यस्तरीय बँकर्स कमिटीने (एसएलबीसी) सर्वच राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांना दिले आहेत.
सीबीलच्या आडून शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, असेही एसएलबीसीने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या सीबीलच्या मुद्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संताप व्यक्त केला होता.
शेतकऱ्यांना पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेशही फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.