Anuradha Vipat
घरात विशिष्ट घटना घडणे हे तुमच्या घरात देवाचा वास असल्याचे किंवा दैवी शक्तीचा आशीर्वाद असल्याचे शुभसंकेत मानले जातात.
घरात प्रवेश करताच मनाला एक वेगळीच शांतता आणि प्रसन्नता जाणवते.
कोणत्याही उदबत्ती किंवा परफ्युमचा वापर न करताही घरात कधीकधी मंद, नैसर्गिक आणि गोड सुगंध दरवळतो.
ज्या घरात नियमित पूजा होते आणि सकारात्मक ऊर्जा असते तिथे तुळशीचे रोप नेहमी ताजेतवाने आणि हिरवेगार राहते.
कधीकधी घरात भिंतीवर किंवा जमिनीवर नैसर्गिकरित्या स्वस्तिक, ओम किंवा त्रिशूल अशी शुभ चिन्हे उमटलेली दिसतात.
घरात आल्यावर किंवा सकाळी उठल्यावर फ्रेश आणि उत्साही वाटत असेल तर हे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार असल्याचे लक्षण आहे.
तुमच्या घरी वारंवार चांगले पाहुणे येत असतील तर हे घरात सुख-समृद्धीचा वास असल्याचे प्रतीक आहे.