Team Agrowon
आषाढी वारीनिमित्त वारकरी आपापल्या दिंडीतून पंढरीच्या दिशेने पायी चालत जातात.
या वारीत बायोस्फिअर्स संस्था, क्षितिज फाऊंडेशन आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची यांच्यावतीने देशी बीज प्रसाद अभियान राबविण्यात आले.
या सोहळ्यात वारकरी संप्रदायास सुवर्ण पिंपळ हे बीज वाटण्यात आले.
हे बीज आळंदी येथील मूळ सुवर्ण पिंपळाचे आहे. ते उपलब्धतेनुसार संकलित करून बीज प्रसाद म्हणून वाटण्यात येत आहेत.
आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी जवळ अजानवृक्ष आहे.
वारकऱ्यांनी जास्तीत जास्त ठिकाणी या बीजापासून रोपांची निर्मिती करावी.
तसेच पंढरीच्या वारी दरम्यान पालखी मार्गावर हे बीज सर्वदूर करावं असं उद्देश या अभियानाचा आहे.
या सुवर्णपिंपळ व इतर देशी वृक्षांच्या बीजाचे वाटप भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या शुभहस्ते वारकरी संप्रदायाला उपस्थितीत करण्यात आले.