Team Agrowon
यंदा महाराष्ट्रातील साखर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. राज्यातील साखर उत्पादन घटल्यामुळे याचा फटका देशाच्या एकूण उत्पादनाला बसला आहे.
देशात १५ एप्रिलअखेर ३११ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्या वर्षी याच कालावधीत ३२८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.
महाराष्ट्रात गेल्या हंगामात याच कालावधीत १२६ लाख टन साखर उत्पादन झाले होते. या तुलनेत यंदा १०५ लाख टन साखर उत्पादित झाली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल २० लाख टनांनी साखर उत्पादन कमी झाले आहे. जवळपास इतकाच फरक देशाच्या साखर उत्पादनावरही झाला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तर प्रदेशात साखर उत्पादन २ लाख टनांनी वाढून ९६ लाख टन झाले आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत उ. प्रदेशात ९४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.
कर्नाटकात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ लाख टनाने साखर उत्पादन घटले. या कालावधीत कर्नाटकात गेल्या वर्षी ५८ लाख, तर साखर तयार झाली होती. यंदा ती ५५ लाख टनावर आली आहे.
गेल्या वर्षी देशात उत्पादनात आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राने यंदा सर्वप्रथम आपला पूर्ण हंगाम संपवला आहे. महाराष्ट्राचे साखर उत्पादन थांबल्याने आता उत्तर प्रदेशातून होणारे साखर उत्पादनच देशातील साखर उत्पादनामुळे काही प्रमाणात भर पडणार आहे.