Anuradha Vipat
उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी हलका, थंड आणि पाण्याचे प्रमाण जास्त असलेला आहार घेणे आवश्यक असते.
कलिंगड, टरबूज, संत्री, द्राक्षे आणि पपई यांसारखी फळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढतात.
ताक, नारळ पाणी, लिंबू सरबत, वाळा सरबत आणि कोकम सरबत यांचा समावेश करा.
काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असते, उष्माघातापासून वाचवण्यासाठी गुणकारी मानली जाते.
दह्यातील प्रोबायोटिक्स पचन सुधारतात आणि पोट शांत ठेवतात.
दूधी भोपळा, पडवळ, कारले आणि कोबी यांसारख्या पाण्याचं प्रमाण जास्त असलेल्या भाज्या खाव्यात.
जास्त तेलकट, तिखट आणि मसालेदार, कॅफिन आणि अति प्रमाणात साखर असलेले पदार्थ खाणे टाळा.