Team Agrowon
गेल्या दोन दिवसांत राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने धूमाकुळ घाताला आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या कष्टाची माती झाली आहे.
अशातच आपला दोन दिवसीय अयोध्या दौरा संपल्या संपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला आहे.
पीक नुकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले.
गारपीट आणि अवकाळीचा फटका बसलेल्या नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे देखील उपस्थित होते.
दरम्यान, राज्याच्या विविध भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.