Aslam Abdul Shanedivan
मधुमेहाच्या व्यक्तींना त्यांच्या डाएटवर विशेष लक्ष द्यावे लागते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवू नये यासाठी देखील खानपाणावर मर्यादा घालाव्या लागतात.
फळांमध्ये नैसर्गिक साखर असल्याने, मधुमेहाच्या रुग्णांसाठी फळे खाणे सुरक्षित आहे. पण ती नियंत्रित प्रमाणात. मग ती कोणती? ती फळे पुढील प्रमाणे...
किवीचे फळ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवली जाऊ शकते.
जांभूळ हे फळ डायबिटीजच्या रुग्णांसाठी अतिशय सर्वोत्तम फळ आहे. हे फळ आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.
डायबिटीजच्या रुग्णांसाठी स्टार फ्रूट आणि पेरू फायदेशीर आहे. हे फळ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करुन बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करते. पेरूमध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन ए’ आणि ‘व्हिटॅमिन सी’मुळे फायदा होतो.
बेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट्स असतात. मधुमेही रुग्ण शरीरातील साखरेची पातळी निरोगी ठेवण्यासाठी, त्यांच्या आहारात बेरींचा समावेश करू शकतात.
सफरचंदामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स असतात, जे शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासह रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. याबरोबरच आपण आपल्या आहारात अननस, नाशपाती, कलिंगड, फणस देखील घेऊ शकता. हे देखील फळे आपल्याला मधुमेहापासून लढण्यास मदत करतात.