Team Agrowon
जनावरांना वेळेवर व नियमित पुरेसा चारा व पाणी न मिळाल्यामुळे त्यांचे कुपोषण होते, तर बऱ्याच वेळा चरायला सोडल्यानंतर जनावरांना खाण्यास काहीच न मिळाल्यामुळे त्यांची उपासमार होते.
चयापचयाचे आजार सर्वसाधारणपणे आहारातून कमी ऊर्जेचा पुरवठा झाल्यामुळे उद्भवतात.
अपुऱ्या चाऱ्यामुळे जनावरांची पूर्ण भूक भागत नाही. त्यांचे पोट भरत नाही, त्यामुळे जनावरं कोणतीही हिरवी वनस्पती, खुरटी झुडपं चारा समजून खातात.
खराब वातावरण किंवा खुराकातील धान्याच्या प्रमाणातील बदल यामुळे आम्लधर्मीय अपचनाची समस्या उद्भवते.
जनावरांचे संगोपन मुख्यतः वाळला चारा, कडबा, शेतातील दुय्यम पदार्थांवर केले जात असेल तर जनावरांना शरीरपोषणासाठी कॅल्शियम, फॉस्फरसचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व नियमित होत नाही.
मॅग्नेशियमची कमतरता मुख्यतः थोडा हिरवा चारा व जास्त वाळला चारा उपलब्ध असण्याच्या कालावधीत होते.
जनावरांना दूरवर चरण्यासाठी फिरवण्याऐवजी एका ठिकाणी ठेवून त्यांना उपलब्ध चारा द्यावा. जेणेकरून विनाकारण फिरण्यामुळे उर्जेचा ऱ्हास होणार नाही, कोणतीही विषबाधा होणार नाही.