Team Agrowon
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेलं उजनी धरण. या धरणाचे बांधकाम १९६९ ते १९८० या काळात या धरणाची निर्मिती करण्यात आली.
पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर उजनी धरण बांधण्यात आलं आहे. या धरणामुळे गावच्या गावं पाण्याखाली गेली.
धरणाच्या निर्मीतीमुळे इंदापुरजवळील पळसदेव गावातील प्राचीन पळसनाथाचं मंदिर १९७५ साली उजनीच्या पोटात गुडूप झालं.
प्राचीन शिल्पकलेचा नमुना असलेलं पळसनाथ मंदिर इ.स. १९५७ ला निर्माण झाल्याचा उल्लेख शिलालेखांवर आढळतो.
अभ्यासकांच्या दाव्यानुसार हे मंदिर चालुक्यकालीन असावे. फलटणच्या राजे निंबाळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख मिळतो.
चालुक्यकाळातील काही शतकांपूर्वी बांधण्यात आलेलं हे मंदिर पाण्याखाली असूनही आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे.
हेमाडपंती बांधणीतील सभामंडप, सप्तभूमीज पद्धतीचे शिखर, कोरीव छत, गर्भगृह, अशा स्वरूपातील हे मंदिर शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे.
१००० हजार वर्षापूर्वीचं उजनीच्या पोटात गडूप झालेलं मंदिरातील दगडी शिळांवरील सुबक कोरीव नक्षीकाम पाहताना मन मोहून जातं.
मंदिर बुडाल्यानंतर २००१ साली पहिल्यांदाच उघडे पडले होते. त्यानंतर बारा वर्षांनंतर ते पाहायला मिळाले.
उजनी धरणाच्या जलसाठय़ात १९७८ मध्ये या मंदिराला जलसमाधी मिळाली. त्यानंतर पळसदेव येथे नव्या गावठाणात श्री. पळसनाथाचे नवे मंदिर उभारण्यात आले.
मूळ मंदिरातील शिवलिंग व देवळातील नंदीची स्थापना नव्या मंदिरात केली. आजही प्राचीन काळापासून चैत्र पौर्णिमा व महाशिवरात्रीस भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात.