sandeep Shirguppe
तमालपत्राचा (दालचिनीची पाने) जास्त वापर भारतीय जेवणात होतो तमालपत्रामध्ये अनेक औषधी गुण आहेत.
तमालपत्रात पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, सेलिनिअम असतं तर याची पाने जेवणाचा सुगंध वाढविण्यासाठी मदत करतात.
अपचन होत असेल किंवा पोटातील समस्या असेल तर चहामध्ये तमालपत्रचा वापर केल्यास आराम मिळेल.
कफ, अॅसिडिटी, पित्त या समस्यातून तुम्हाला आराम मिळू शकतो.
तमालपत्रामुळे रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत होते.
तुम्हाला रात्री चांगली झोप हवी असेल तर तमालपत्राचे पाणी सेवन केल्यास चांगली झोप लागेल.
तमालपत्र पाण्यात टाकून पाणी उकळून पाणी थंड करुन पिल्यास किडनी स्टोन, किडनीबाबतच्या समस्यांवर मात करता येते.
डोके दुखत असेल मान दुखत असेल तर तमालपत्राच्या तेलाने मसाज केल्यास त्याचा लाभ मिळतो.