Team Agrowon
गणेश रानडे यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत शेतीत प्रयोगशील वृत्ती जपत कृषी पर्यटन केंद्र सुरू केले आहे.
नाटे गावाला समुद्र किनाऱ्याचे वरदान आहे. काही अंतरावर आंबोळगडचा निसर्गरम्य किनारा आहे.
समुद्र किनाऱ्यापासून दोन किलोमीटवर केंद्र वसले आहे. गेल्या चौदा वर्षांच्या काळात अनुभव, भांडवल, पर्यटकांच्या गरजा यानुसार केंद्राचा टप्प्याटप्प्याने विस्तार केला आहे.
कृषी पर्यटन केंद्रात उंचावर मचाण तयार केले आहे. तेथून संध्याकाळी सूर्यास्त व त्यानंतर चौफेर परिसर अनुभवणे ही पर्वणीच असते.
शहरातील लोकांना खेड्यातील जीवन अनुभवता येत नाही ही बाब लक्षात घेऊन पर्यटकांना झाडावर चढून आंबा तोडणे व खाणे या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव दिला जातो.
आंब्याची काढणी, ग्रेडिंग, पॅकिंग कसे केले जात याची माहिती दिली जाते. त्यातून बागायतदारांना येणाऱ्या समस्यांचे आकलन देखील पर्यटकांना होते.
आपल्याच बागेत सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली ताजी भाजी पर्यटकांना खाऊ घालणे हा वेगळा आनंद असतो. शुद्ध शाकाहारी जेवण मिळते.