Team Agrowon
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये 'शारदा प्रशिक्षण केंद्रा'च्या ८६ युवतींनी यश मिळवत पोलीस दलात भरती झाल्या आहेत.
या ८६ रणरागिणींची महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर निवड झाली आहे.
ग्रामीण ग्रामीण भागातील सावित्रीच्या लेकींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे यश मिळवले यश कौतुकास्पद आहे.
शारदानगरच्या या नव्याने पोलीस दलात रुजू झालेल्या युवती, पालकांचा सत्कार ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र दादा पवार व विश्वस्त सौ सुनंदा पवार यांनी केला.
शारदा प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतलेल्या तब्बल ६१३ मुली सध्या राज्य पोलीस दलात कार्यरत असून आता भरती झालेल्या युवतींमुळे ही संख्या थेट ७०३ वर पोहोचली.
कोणत्याही शैक्षणिक संस्थेने विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्या करिअर साठी स्वतःहून केलेल्या प्रयत्नांना मिळालेले हे मोठे यश आहे.
पोलीस दलात रुजू झाल्यानंतर सद्सद विवेक बुद्धीने निर्णय घ्या. आयुष्यात कामाशी प्रामाणिक राहण्याचा सल्ला संस्थेच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी या युवतींना दिला.
तसेच उच्च शिक्षण पूर्ण करून या युवतींनी पीएसआय व डीवायएसपी पदाला गवसणी घालावी, अशी इच्छाही सुनंदा पवार यांनी यावेळी बोलून दाखवली.
ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त तथा शारदा पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुख सुनंदाताई पवार यांच्या संकल्पेनेतून ग्रामीण भागातील युवतींसाठी मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाते.