Team Agrowon
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल लागला
यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल 91.35 टक्के लागला आहे.
राज्यात एकूण १४ लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १२ लाख ९२ हजार ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. 93. 73 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 89.14 टक्के आहे. मुलांपेक्षा पाच टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
विभागनिहाय निकालाची टक्केवारी पाहता कोकण विभाग अव्वल स्थानी आली आहे. या विभागाचा निकाल 96.01 टक्के लागला
मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागला असून 88.13 टक्के लागला आहे.
पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या (रिपीटर) निकालाची टक्केवारी- 44.33 टक्के आहे