बाजारातील वाढत्या आवकेबरबोर तिळाच्या भावातही नरमाई दिसून आली. बाजारात सध्या तिळाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते १२ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे दर मिळत आहेत. गाजराला बाजारात चांगला उठाव आहे. तसेच गाजराची आवकही चांगली सुरु आहे. सध्या गाजराला प्रतिक्विंटल सरासरी १२०० ते १५०० रुपयांचा भाव मिळत आहे. राज्यातील पपईला सध्या चांगली मागणी आहे. पपईचे भाव मागील काही दिवसांमध्ये क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांनी कमी झाले आहेत. पपईला सध्या १२०० ते १६०० रुपयांचा भाव मिळत आहे. सध्या उन्हाचा चटका वाढल्याने काकडीला चांगली मागणी आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागात काकडीला सध्या १ हजार १०० ते १ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारातील सोयाबीनची आवक खूपच कमी झाली. सध्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ४ हजार १०० ते ४ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव ४ हजार ४५० ते ४ हजार ५५० रुपयांच्या दरम्यान आहेत. नाफेडची विक्री ४ हजार ३०० ते ४ हजार ३५० रुपयाने होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.