Banana Farm Agrowon
ॲग्रो विशेष

Khanesh Banana Crop Issue: खानदेशातील केळीपट्टा उष्णतेमुळे होरपळला

Crop Damage Due to Heat: खानदेशातील केळी बागांना उष्णतेच्या तडाख्यामुळे मोठा फटका बसला आहे. ४४ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानामुळे केळीच्या बागांमध्ये ३० टक्के हानी झाली असून, शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: खानदेशात केळीपट्टा उष्णता व उष्ण वाऱ्यांमुळे होरपळला आहे. यामुळे बागांची ३० टक्के हानी झाली असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. लहान व निसवलेल्या अशा सर्वच केळी बागांना उष्णतेचा फटका बसत आहे.

खानदेशात मृग बहर व कांदेबाग केळी बागा आहेत. यात मृग बहर बागांची लागवड मागील वर्षी मे ते जुलै या कालावधीत झाली होती. तर कांदेबाग केळीची लागवड मागील वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत झाली आहे. यात कांदेबाग केळी पीक सात ते पाच महिन्यांचे आहे. तर मृग बहर बागांत घड पक्व झाले आहेत. काही उशिराच्या बागांत निसवण १०० टक्के झाली आहे. या सर्वच बागांना उष्णतेचा फटका बसत आहे.

कारण केळी पीक ४०-४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानात तग धरत नाही. सिंचन, खत व्यवस्थापन काटेकोरपणे करूनही अति उष्णतेत बागांची हानी होते. त्यात निसवलेल्या व काढणीवरील बागांत झाडे मोडून पडणे, घड सटकून खाली पडणे अशा समस्या वाढल्या आहेत. जे झाड मोडून पडते किंवा ज्याचा घड सटकून पडतो, ते झाड पुन्हा उत्पादन देत नाही.

संबंधित झाडाचे १०० टक्के नुकसान होते. यात मध्येच वेगाचा वारा असतो. यातही बागांची हानी होत आहे. कारण सध्या रात्रीपर्यंत उष्ण झळा असतात. सकाळी १० ते सायंकाळी चारपर्यंत तापमान अधिक असते. खानदेशात मागील महिनाभरापासून कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. एप्रिलमध्ये सात दिवस कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते.

या महिन्यातही कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिले आहे. यामुळे बागांची वाढ खुंटून मोठी हानी झाली आहे. खानदेशात कांदेबाग व मृग बहर केळीची मिळून सुमारे ७६ ते ७८ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. या सर्वच बागांत मिळून ३० ते ३२ टक्के नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. केळी बागांचे नुकसान रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, जळगाव, पाचोरा-भडगाव, चाळीसगाव, जामनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा, नंदुरबार, अक्कलकुवा आदी भागांत झाली आहे.

उपायही पडताहेत अपुरे

अनेक शेतकऱ्यांनी उष्णतेपासून बचावासाठी बागांभोवती वारा अवरोधक म्हणून हिरवी नेट लावली आहे. काहींनी नैसर्गिक वारा अवरोधक म्हणून बागांच्या पश्चिम व दक्षिणेला उंच वाढणाऱ्या गवताची लागवड केली आहे. परंतु अशातही बागांत उष्ण वारा शिरत आहे. कारण कमाल तापमान मागील ३० ते ३५ दिवसांपासून ४१ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत राहिले आहे.

मी ऑक्टोबर २०२४ मध्ये केळीची लागवड केली आहे. मागील अनेक दिवस कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिकही राहिले आहे. दुसरीकडे पाण्याची गरज पिकास अधिक आहे. विजेचा लपंडाव असतो. उष्णतेच्या समस्येवरील उपाययोजना करूनही अपयश येत आहे.
सौरव महाजन, केळी उत्पादक, खेडी खुर्द, जि. जळगाव
केळी पीक हे अति उष्णतेत तग धरत नाही. पण उष्णता किंवा तापमान अधिक राहत आहे. यामुळे पिकाला फटका बसत आहे. पाणी, बागोभावती बारा अवरोधक, खते याबाबत नियोजन केलेल्या शेतकऱ्यांच्या केळी बागांचा काहीसा बचाव या उष्णतेत झाल्याचे दिसते.
महेश महाजन, प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, पाल, ता. रावेर, जि. जळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Deforestation Crisis: धुळे, नंदुरबारमध्ये वनराईवर संकटाची छाया

Sugarcane Farming: सांगली जिल्ह्यात ३३ हजार हेक्टरवर ऊस लागवड

Onion Crop Destroy: भाव नसल्याने कांद्यावर फिरवले ‘रोटाव्हेटर’

Mineral Development Fund: दोन कोटी रुपयांचे निविष्ठा प्रकरण गाजणार विधिमंडळात

Onion Price Issue: आठ रुपयांत कांदा विकायचा तरी कसा? शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT