Pune News: अहिल्यानगरसह मध्य महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना खरिप २०२४ मधील पीक नुकसानीपोटी भरपाई मंजूर झाली आहे. ३० एप्रिलपर्यंत या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना २९८ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली. त्यापैकी १२२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. तर उरलेले १७६ कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरु आहे, असे कृषी विभागाने सांगितले.
अहिल्यानगरसह मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिप हंगाम २०२४ मधील पीक नुकसानीपोटी केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रीगरमधून भरपाई मंजूर झाली आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती म्हणजेच अग्रिम भरपाई एकाही जिल्ह्यात मंजूर झालेली नाही.
अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या ६ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रीगरमधून ३० एप्रिलपर्यंत २९८ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली. त्यापैकी ३० एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात १२२ कोटी रुपये जमा झाले. तर १७६ कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरु आहे. ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे कृषी विभागाने सांगितले.
अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रीगरमधून ३० एप्रिलपर्यंत १४१ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली होती. त्यापैकी ३० एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ९४ कोटी रुपये जमा करण्यात आले. उरलेले ४७ कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरु आहे, असे कृषी विभागाने सांगितले.
सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रीगरमधून १३९ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली. त्यापैकी ३० एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात १९ कोटी रुपये जमा करण्यात आले. उरलेले १२० कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरु आहे, असे कृषी विभागाने सांगितले.
पुणे
पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रीगरमधून जवळपास ३ कोटी रुपये भरपाई मंजूर झाली. त्यापैकी एकही रुपया अजून शेतकऱ्यांना मिळाला नाही. ही रक्कम जमा करण्याचे काम सुरु आहे, असे कृषी विभागाने सांगितले.
सातारा
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रीगरमधून केवळ ५६ लाख रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली. त्यापैकी शेतकऱ्यांना ५२ लाख रुपये मिळाले आहेत.
सांगली
सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रीगरमधून ३० एप्रिलपर्यंत ७ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली. त्यापैकी ३० एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ३ कोटी रुपये जमा करण्यात आले. उरलेले ४ कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरु आहे, असे कृषी विभागाने सांगितले.
कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रीगरमधून ३० एप्रिलपर्यंत ७ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली होती. त्यापैकी ३० एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ६ कोटी रुपये जमा करण्यात आले, असे कृषी विभागाने सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.