Chhatrapati Sambhaji Nagar News : सामान्य जनतेच्या कल्याणासाठी शासन अनेक योजनांची अंमलबजावणी करते. या योजनांचा लाभ देण्याबरोबरच प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी समन्वयातून सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे आवाहन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या समन्वय बैठकीत ते बोलत होते. या वेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, शिरीष बोराळकर, संजय किणीकर, तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते.
महसूल मंत्री म्हणाले, की शासकीय योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या सोडण्यासाठी पदाधिकारी काम करत असतात. हे काम करत असताना प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांना मदत करणे आवश्यक आहे.
पदाधिकारी आणि अधिकारी यांनी समन्वयाने काम केल्यास शासकीय योजना तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचतील, असेही ते म्हणाले. शासन आपल्या दारी हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
विविध योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि संबंधित अधिकारी यांची बैठक घ्यावी, असेही ते म्हणाले.
या वेळी आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब तसेच शिरीष बोराळकर, संजय किणीकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. त्या सूचनांची दखल घेऊन त्यावर तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश महसूलमंत्र्यांनी दिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.