
Sugarcane Water Management : पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिकांना पाण्याचा ताण बसत आहे. आडसाली उसाची लागवड नुकतीच झालेली आहे. उसाची पाण्याची गरज इतर पिकांच्या तुलनेत जास्त असते. आडसाली उसासाठी हेक्टरी ३२५ ते ३५० लाख लिटर पाण्याची गरज असते. साधारणपणे ३८ ते ४० पाण्याच्या पाळ्या लागतात. दोन पावसाळ्यामुळे आठ ते दहा पाणी कमी लागते. ठिबक सिंचन पद्धतीमुळे ५० टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत होते. तर उत्पादनात २० टक्के वाढ, खतामध्ये सुद्धा २५ टक्के बचत होते.
उसातील पाण्याचे योग्य नियोजन
- मातीची भौतिक तपासणी करून ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करावा. ठिबक सिंचनाचे पाणी सरीच्या दोन्ही बाजूस पोहोचत असल्याने ओलावा तपासून खात्री करावी.
- अति पाणी हे ऊस तसेच साखरेचे उत्पादन घटवते. सौम्य प्रमाणात पाण्याचा ताण ऊस उत्पादन वाढविते.
- फुटवे फुटण्याच्या वेळेस जर जास्त पाणी दिले तर मुळाजवळ हवेचे प्रमाण कमी होते. फुटवे कमी निघतात. उसाची उंची तसेच कांड्यांची लांबी वाढणे गरजेचे असते. कारण यामध्ये साखर साठवली जाते. उसाचे वजन वाढते.
- उगवणी अवस्था तसेच कोंब स्थिर होण्याच्या कालावधीत हलके परंतु वारंवार पाणी देणे महत्त्वाचे आहे.
- सुरुवातीच्या काळात जमीन फक्त ओली असणे महत्त्वाचे आहे. जमिनीत हवा खेळती असावी.
- सुरुवातीच्या काळात पाण्याचा ताण असेल तर जमीन कोरडी राहते. त्यामुळे उगवन उशिरा आणि कमी प्रमाणात होते.
- पाण्याचा जास्त प्रमाणात वापर झाल्यास शेतात पाणी उभे राहिल्यास उसावरील डोळे कुजतात तसेच उगवून आलेले कोंबही मरतात. उगवणीचे प्रमाण कमी राहते. यामुळे पुढे जाऊन अपेक्षित ऊस संख्या मिळत नाही.
- आडसाली उसासाठी सरी वरंबा पद्धतीने लागवड केली असल्यास उसाची पाण्याची गरज इतर पिकांच्या तुलनेत जास्त असते. तरीही ऊस पिक इतर पिकांच्या तुलनेत पाण्याचा ताण बऱ्यापैकी सहन करते.
माहिती आणि संशोधन - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.