
Akola News : तुरीचे उत्पादन वाढविण्यासाठी ३५ ते ४५ व्या दिवशी शेंडा खुडणी करणे महत्त्वाचे आहे. तूर पिकांमध्ये वेळीच शेंडे छाटल्यामुळे फांद्यांच्या संख्येत वाढ होऊन फांद्यावर फूल आणि शेंगाच्या संख्येत मोठी वाढ होते. सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरही तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ज्ञ कुलदीप देशमुख यांनी केले.
बाळापूर तालुक्यातील खामखेड येथे आत्मा व कृषी विभागामार्फत खरीप तूर पिकाची शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, प्रकल्प उपसंचालक मिलिंद जंजाळ, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजिला होता. सरपंच ज्योत्स्नाताई हागे, तालुका तंत्र अधिकारी विजय शेगोकार, पोकरा प्रकल्पाचे समन्वयक गोपाल बोंडे, कृषी पर्यवेक्षक रवींद्र भोजने, कृषी सहाय्यक गोपाल राऊत उपस्थित होते.
शेतीशाळा यशस्वी होण्यासाठी कृषिमित्र सुरेश इंगळे, पोलिस पाटील संतोषराव हागे, उद्धवराव हागे, संतोष साबळे, गोपाल शेगोकार आदी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.