
Sindhudurg News : ‘चांदा ते बांदा’ योजनेअंतर्गत भातपीक प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतलेल्या जिल्ह्यातील हजारांहून अधिक शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. ही योजना बंद झाल्यामुळे हजारो शेतकरी चिंतेत आहेत. या शेतकऱ्यांना अनुदान द्यायचे कसे, असा प्रश्न कृषी विभागासमोर निर्माण झाला आहे.
सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांसाठी तत्कालीन सरकारने ‘चांदा ते बांदा’ योजना राबविली. या योजने अंतर्गत विविध वैयक्तिक योजना शेतकऱ्यांना देण्यात आल्या. दरम्यान २०१९ मध्ये ‘चांदा ते बांदा’ योजनेतून जिल्ह्यात भातपीक प्रात्यक्षिक योजना राबविली गेली.
या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी शेतकऱ्यांना ६ हजार ७०० रुपयांचे साहित्य देण्यात येणार होते. त्यामध्ये लाभार्थी हिस्सा ५०० रुपये होता. उर्वरित ६ हजार २०० रुपये अनुदान शासन शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार होते.
या योजनेतून शेतकऱ्यांना बॅट्री पॉवर स्प्रे, कोळपणी यंत्र आणि १५ किलो झिंक सल्फेट असे किट देण्यात आले. शेतकऱ्यांकडून सर्व रक्कम घेण्यात आली. जिल्ह्यातील १ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग दर्शविला.
मात्र मार्च २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला. त्या कालावधीतील सर्व अनुदान थांबविण्यात आले. त्यानंतर शासनाने ‘चांदा ते बांदा’ योजनाच बंद केली. कृषी विभागाने तालुकास्तरावर शक्य तितक्या शेतकऱ्यांना अन्य योजनांतून लाभ दिला. परंतु शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे कृषी विभाग हतबल आहे. साधारणपणे सर्व शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी ६२ लाख रुपये निधीची गरज आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.