

Parbhani News : छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक सुधारणा केल्या. सिंचन सुविधा वाढवल्या. शेतकऱ्यांचे शोषण थांबवले. विद्यापीठ देखील या आदर्शावर आणि प्रेरणेतून कार्य करत असून, विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण आत्मसात करावेत, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने बुधवारी (ता. १९) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा होते.
कुलसचिव संतोष वेणीकर, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, नियंत्रक प्रवीण निर्मळ, विद्यापीठ अभियंता दीपक कशाळकर, डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. जया बंगाळे, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. राहुल रामटेके आदी उपस्थित होते.
या वेळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, पदके व प्रेरणादायी पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन किशोर जाधव यांनी केलेतर आभार डॉ. आर. जी. भाग्यवंत यांनी मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.