Ahilyanagar News : सप्टेंबर महिन्यात नद्यांना आलेल्या पुराने नदीकाठच्या जमिनी वाहून, खरडून गेल्या आहेत. विहिरींचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल विभागाकडून सुरू आहेत. .दिवाळी सण सरला असला तरी अजूनही पंचनामे पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे जमिनी वाहिलेल्या शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. नेमकी किती मदत मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात पूर, अतिवृष्टीने मोठी हानी झाली आहे. .Soil Erosion: खरडून गेलेल्या जमिनीचे व्यवस्थापन करण्यासाठी उपाययोजना.पंधरा दिवस अति मुसळधार पाऊस कोसळल्याने प्रशासनाकडील नोंदीनुसार १०० पेक्षा अधिक महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली. त्यात प्रामुख्याने पाथर्डी, शेवगाव, नेवासा, जामखेड, पारनेर, अहिल्यानगर, राहाता, कोपरगाव, तालुक्यांत तुलनेने अधिक नुकसान झाले. .Rain Damage Compensation : खरडून गेलेल्या जमिनीचे अचूक पंचनामे करा.साधारण वीसपेक्षा अधिक मंडलांत चार ते पाच वेळा सलग अतिवृष्टी झाली. सीना, मुळा, प्रवरा, खैरी, कुकडी, ढोका, नंदीनीसह स्थानिक नद्याला पुर आले. पुराचे पाणी शेतात घुसल्याने पिके तसेच नदीकाठची मोठ्या प्रमाणात शेती वाहून गेली आहे. .मात्र या पुराचा विहिरींनाही मोठा फटका बसला आहे. पुराच्या अतिवेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी विहीरी खचल्या असून काही विहिरीची कठडे तुटले. नदीकाठच्या विहिरीत पाणी घसल्याने गाळही जमा झाला आहे. शिवाय पुरात विहिरीतील विद्युतपंप व इतर साहित्य वाहून गेले आहे. जिल्ह्यातील साधारण ३१३ गावांत २०६८ विहिरीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.