Jalgaon News : खानदेशात खरिपात कापूस प्रमुख पीक आहे. परंतु कापूस पिकात रोगराई व पावसाने कैऱ्या लाल, काळ्या पडून नुकसान होऊ लागले आहे.
मे महिन्यात लागवड केलेल्या कापूस पिकात अधिकचे नुकसान होत आहे. काळ्या कसदार जमिनीत वाफसा स्थिती नाही. वातावरणही कोरडे, निरभ्र नसल्याने पिकाची वाढही हवी तशी नाही. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
खानदेशात अनेकदा पोळा सणाला शेतात कापूस पिकात बोंडे उमलतात किंवा कापसात वेचणी सुरू होते. यंदाही काही भागात बोंडे उमलली आहेत. परंतु पावसाने पिकाची हानी होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कापूस पिकाला अधिकचा पाऊस बाधा पोहोचवितो,
असेही शेतकरी म्हणतात. कापसाची लागवड खानदेशात सुमारे आठ लाख हेक्टरवर झाली आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यातील लागवड पाच लाख ११ हजार हेक्टरपेक्षा अधिक आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.